शब्द माहितीतला आणि पुढे प्रश्नचिन्ह का? असे प्रश्नचिन्ह तुमच्या मनात येऊ शकते, पण मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे.
दिवाळी च्या सुट्टीच्या निमित्ताने छोटी trip काढायचं ठरवलं आणि
आम्ही कोकण, कोल्हापूर आणि अजून थोडी आसपासची ठिकाण बघण्याचा
plan बनवला. कोकण दर्शन तर अगदी उत्तम झाले, छोटी छोटी
देवस्थानं, सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे, अगदी मजा आली.
गणपतीपुळे च्या मंदिराने तर मोहिनीच घातली, शांत सुंदर वातावरण आणि चांगले नियोजन ह्यांनी मनाला शांतता मिळाली
इथली प्रदक्षिणा तर खरच फारच लक्षात राहणारी होती, देव चांगली सेवा
करवून घेतो भक्तांकडून. प्रत्येक गोष्ट अगदी नीट-नेटकी आणि नियोजनबद्ध, राहण्याची सोय सुद्धा छान. Sand-art सध्या फार प्रसिद्ध
आहे मग आम्ही पण आपला हात अजमावला आणि sandman बनवला
इथ परेंत सफर अगदी सुरेख चालू होती मग तुम्ही विचाराल कि
प्रश्नचिन्हाचा अर्थ काय? तर ती कथा इथे सुरु होते, पुढे आमची गाडी कोल्हापूर कडे वळली, अंबाबाई चे दर्शन घायला आणि सगळा भ्रमनिरास झाला. मान्य, कि इथे गर्दी जरा जास्त असते आणि सुट्टी मध्ये तर जास्तच, पण अत्यंत ढिसाळ नियोजन आणि भावना शून्य लोकांचा इथे भरणा आहे. गेल्या वर राहायला जी जागा मिळाली ती माणसांच्या राहण्या लायकीची नवतीच मुळी, आणि AC, non AC च्या फंदात उणे पुरे १५०० रुपये उकळले गेले, जायला एरवी कुणी ५०० सुद्धा
दिले नसते. पुढे मंदिर दर्शनाची वेळ आली, बाहेर देवीला चढवायची ओटी
मिळते कमी अधिक नाही चांगले २०० रुपये घेतले गेले, आता ती साडी
देवी ला "कितव्यांदा" चढवली जात होती हे ती अंबा बाईच जाणे.
दर्शनाची हि भली मोठी रांग त्यात मला भावनाशुन्य जे म्हणतात
तशे लोक दिसले, इथे आलेले लोक हे लोक नसून गुरं-ढोरं आहेत आणि
आपण गुराखी आहोत अश्या आविर्भावात ते वागत होते. आपण आपले
तासंतास रांगेत उभे राहा आणि कोणा बाईच्या "अंगात" काय येते आणि ती आपली फटाफट पुढे जाते ह्याला काय अर्थ आहे? तेव्हा मात्र हे
"गुराखी" मुग-गिळून गप्पं बसतात आणि बाकी लोक रांगेत एका
ऐवजी दोन जण सोबत उभे राहिले तर मात्र उर फुटेस्तोवर
बोंबलतात का तर म्हणे इतरांना जाता येत नाही.
आत सोडल्यावर तर देवी पेक्षा माणसेच जास्त राज्य करतात,
"ओ ताई काय बावळट सारखं करता? दिसत नाही का? समोर चला(!!!!)"
ह्या शहाण्याला हा अधिकार "देवीनेच" तर दिलाय म्हणत आपण सुद्धा पुढे निघतो, "चला चला हला हला" च्या आरोळ्या हे "मेंढपाळ"
देत असतात आणि "भक्तरुपी गुरे" पुढे चालत असतात. देवी जवळ पोहोचा, मी अंबा बाईची शप्पथ घेऊन सांगते मला मंदिरात
जाऊन सुद्धा ती दिसलीच नाही, कारण "चला चला हला हला"!!! . आईने थांबून प्रसाद घेतला पण तेही अनेक धक्के खात, बाहेर येई परेंत त्या आरोळ्या तुमची पाठ सोडत नाहीत.
माणूस मंदिरात कशाला जातो? देव बघायला! अरे पण जर हि
अशी परिस्थिती असेल तर मग मंदिर काय कामाचं? घरीच बसा आणि देवीचा फोटो बघून मनः शांती करून घ्या न. माझा कुणाच्याच भावना
दुखवायचा हेतू नाही पण माझा मंदिरात जाऊन दर्शन घेण्यावारचा
विश्वास उडाला आहे, ह्या प्रकारामुळे. आता मी हा फोटो बघूनच देवी कडे मागणं मागते "बघ बाई जरा..."